book review उत्क्रांती - लेखिका सुमती जोशी

उत्क्रांती - लेखिका सुमती जोशी

अरविंद परांजपे, आयुका, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे ४११००७

सूर्यमालेच्या निर्मिती बद्दल शास्त्राज्ञांत एकमता ने सांगतात त्या प्रमाणे सूर्य आणि ग्रहांची निर्मिती एकाच वेळी झाली होती सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी. आज आपल्या माहीती प्रमाणे पृथ्वी शिवाय इतरत्र सजीव आढळत नाहीत. मग विश्वात इतत्र सजीव नसतीलच का? खगोलशास्त्रज्ञांच्या मते परिस्थितीजन्य पुरावे आपल्याला हेच सांगतात की विश्वात इतरत्र सजीव असले पाहीजेत. पण अनेक जीवशास्त्रज्ञांच मत आहे की एखाद्या ग्रहावर सजीवांची निर्मिती होऊन त्यांची उत्क्रांनी होण एक फार अवघड आणि जटील प्रक्रिया आहे. पृथ्वीवर सजीव नेमके केव्हा आले असतील? त्याची उत्क्रांती कशी झाली असेल? जीवशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की पृथ्वीवर एक पेशीय जिवाणू सुमारे ४.१ ते ३.५ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असतील. सुमारे ५० कोटी वर्षांपूर्वी समुद्रात माशासारख्या सजीव आले असतील. मानवाचे पूर्वज माकड सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी वगैरे. हे आकडे वाचल्या वर आपल्याला खरच खूप काही कळलं का? कदाचित नाही. कारण इतक्या मोठ्या आकड्यांसी आपला संपर्क वरचे वर येत नसतो. पण हेच जर आपण या आकड्यानां वेगळ्या स्वरूपत बघितलं तर? समजा आपण पृथ्वीचा हा ४.६ वर्षांचा इतिहास आपण एका वर्षात मांडला तर? म्हणजे १ जानेवारी रोजी जेव्हा वेळ ० तास ० मिनीटे आणि ० सेकंद होती तेव्हा पृथ्वीचा (आणि अर्थातच सौरमालेचा) जन्म झाला. आणी आज आपण ३१ डिसेंबरच्या २३ वा. ५९ मि. आणि ५९.९९.... सें वर आहोत. तर या कालखंडात पृथ्वीर सजीवांची उत्क्रांती कशी झाली असेल. सुरवातीला पृथ्वी खूप तप्त होती. तिला थंड होण्यासच सुमारे दोन महीने लागले. एक पेशीय जिवाणू मार्च महीन्याच्या शेवटचा आठवडा ते एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवडा या कालावधीत आले असतील. त्या नंतर सुमारे सहा महीने पृथ्वीवर काहीही घडल नाही. नोव्हेबर महीन्याच्या सुमारे पहिल्या आठवड्यात एक पेशी सजीवांची म्हणजे शेवाळ यांची पाण्यात निर्मिती झाली. आणि असे करत आपली सिव्हीलायझेश फक्त ६ सेकंदा पूर्वीची आहे. तर या प्रमाणात पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास हा फक्त दीड महीन्याचा आहे जो अत्यंत रोचक पद्धतीने मांडला आहे उतक्राती या पुस्तकात सुमती जोशी यांनी.

त्या आपल्या मनोगतात म्हणतात ते अगदी खरे आहे की या विषयावर मराठीत फारसे लेखन झालेले नाही आणि त्यानी ही उणीव भरून काढण्याचा चागला आणि उत्तम प्रयोग केला आहे. अजूनही अशा प्रकारचे लेखन आवश्यक आहे आणि या विषयातील तज्ञानी असे लेखन करून मराठी वाचकांच्या समोर हा विषय आपापल्या पद्धतीना मांडावा. पण सुमती जोशीनी केलेले हे योगदान मला खरच बहुमोलाचे वाटले. हे पुस्तक वाचताना मला भाषा आधुनमधून आलंकारिक वाटली खरी, कदाचित ती या साहित्याची गरच असेल, पण तेव्हडीच.

पुस्तक खरच वाचनीय आणि नंतर अभ्यास करण्यासारखच आहे. लेखिका एके ठिकाणी म्हणते की उत्क्रांनी हा विषयच असा आहे की, येथे 'चक्षुवैंसत्यम्' असे काही नसतेच. त्या मुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुराव्याची साखळी जोडत तर कधी या साखळीचा हरवलेला आकडाशोधत उत्क्रांतीचा इतिहास उभा करण म्हणजे एखादी रहस्य कादंबरी लिहीण्यासारख आहे आणि त्याच उत्कंठेने तो वाचण्याचा आनंद हे पुस्तकातून मला मिळाला. आणि तरी ही उत्क्रांतीतील प्रत्येक प्रकरण आपल्यात परिपूर्ण आहे अस मला वाटलं.

प्रास्ताविक या पहिल्या प्रकरणात आपली ओळख या क्षेत्रात जे प्रमुख कार्य झाले, जे विचार मांडण्यात आले आणि त्यातील काहीं विचारांना झालेल्या प्रतिरोधाचा आढावा घेण्यात आला आहे. दुस-या प्रकरणात आपली ओळख चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड वॅलॅसशी करून देण्यात येते. वॅलॅस हा डार्विन पेक्षा १४ वर्षानी लहान. दोघानी स्वतंत्र पणे संशोधन केले. दोघानी थॉमस माल्थस या अर्थतज्ञाच्या लोकसंख्यावाढीचा सिद्धांत वाचला होता. त्याना तो पटला होता. त्या मुळे असेल त्या दोघाच्या सिद्धांतात कमालीचे साम्य. फक्त डार्विनने आपले शोघकार्य प्रसिद्ध केलं नव्हतं. जर वॅलॅसने आपले कार्य प्रसिद्ध केले असते तर त्याला सेंद्रिय उत्क्रांतीच्या सिद्धांतचे श्रेय मिळाले असते. पण त्याला ते मान्य नव्हते. या सर्वांची चर्चा योग्य पद्धतीने, अजीबात मीठ मसाला न लावता, या प्रकारणात केली आहे. पण माल्थसच्या सिद्धांताची आपली प्रत्यक्ष ओळख मात्र नैसर्गिक निवड या ६ व्या प्रकरणात होते.

दुस-या प्रकरणा नंतर आपण एक प्रकारे अभ्यासाच्या दिशेने वळतो. अनुवंशिकता (म्हणजेच आई-वडिलांचे गुण मुलात येणे), विभेदन (आई-वडिलांशी साम्यअसले तरी मुलांच वेगळे असणं) आणि त्याचे रहस्य. ४थ्या प्रकरणा पासून उत्क्रांनीच्या मार्गावर नैसर्गिक निवडीचा नियम आणि तो सिद्धकरता येईल का आणि कृत्रिम निवड यावर चर्चा आपण वाचतो. जीवन संघर्षात टिकून राहण्यासाठी सजीवांनी आपल्यात केलेल्या बदलांची फार सुदर चर्चा अनुकूलन या प्रकरणेत लेखिकेने केली आहे.

सेंद्रिय उत्क्रांतीचे पुरावे हे १०वे प्रकरण मला खूप महत्वाचे वाटले. हे प्रकरण वाचल्यावर हे शास्त्र काय आहे आणि किती अवघड आहे आणि त्याच बरोबर हे किती रोमांचक आहे याची आपल्याला जाणीव होते. नुकतेच मुंबईतील दोन विद्यार्थ्याना विंचवाची एक नवीन प्रजाती सापडल्याची बातमी होती. या शोधाचं महत्त्व हे प्रकरण वाचल असल्या मुळे मला जास्त प्रकर्षाने जाणवलं.

डिझाइननॉईड घटक आणि डार्विनचे फिंच पक्षी ही दोन्ही प्रकरणे वाचताना डिसकव्हरी किंवा एनिमल प्लॅनेट चे एखादे एपिसोड वाचत असल्याचा भास होतो. उपसंहार हे सुमारे चार सव्वाचार पानाचे हे १३वे प्रकरणात एक स्वतंत्र लेखच आहे. शेवटी - पुस्तकाच्या शेवटीजी शब्द सूची आणि संदर्भ सूची देण्यात आली आहे ती नक्किच उपयोगी आहे पण या सूची विशेषतः शब्द सूची आणखीन मोठी असती त्याच बरोबर निर्देश सूची दिली असती तर फार चांगल झाल असतं अस मला वाटतं.

आज आपण, विद्यार्थी आणि विज्ञानाची आवड असलेली मोठी माणस सुद्धा डिसकव्हरी, अँनिमल प्लॅनेट वरील कार्यक्रम फार आवडीने बघतो. निसर्गाबद्दलचे कार्यक्रम बघताना हे पुस्तक वाचले असल्यास ते जास्त चांगले कळण्यात मदत होईल.

अशा प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असल्या मुळे असेल कदाचित याला पानांच्या संख्येची मर्यादा असावी पण जसे राजहंसने जनसामान्यांचे आकाशाशी नाते जुळवले तसेच त्यांचे या पृथ्वीशी पण नाते सुमती जोशीयां यांच्या माध्यामातून जुळवून देण्याचा आवश्य प्रयत्न करावा.

A book on aryabhatiya by Mohan Apte

भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ आर्यभटीय - शब्दार्थ, श्लोकार्थ, स्पष्टीकरण ---- लेखक मोहन आपटे

अरविंद परांजपे, आयुका, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे ४११००७

भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ आर्यभटीय - शब्दार्थ, श्लोकार्थ, स्पष्टीकरण हे पुस्तक लिहीताना प्राध्या,. मोहन आपटेयानी ओखमाच्या वस्त-याचा (Occam's razor) भरपूर आणि मनःपूर्वक उपयोग केलेला दिसतो. थोडक्यात आपल्या प्रबंधाला सोपा आणि सुटसुटीत ठेवण्या करता ज्याची गरज नाही असा भाग त्यानी (ओखमाझ रेझरने) छाटून टाकला आहे. त्या मुळे खरतर या पुस्तका बद्दल काही लिहायचे तर सरळ सरळ पुस्तकातील उतारेच द्यावे लागतील. (ओखमाचा विल्यम या १४ व्या शतकातील तर्कशास्त्री हा विचार मांडला होता की गरज नसताना त्याच त्यात बाबी लिहू नये)

आधीच गागर मे सागर असा हा मूळ आर्यभटीय ग्रंथ आणि त्याला संपूर्ण संमान देत आपटे यानी थोडक्यात या ग्रंथाचा सार आपल्या समोर ठेवला आहे. फक्त सुमारे अडीचशे पानाचे पुस्तक प्रकाशित करण हे कदाचित राजहंसच धाडसच म्हणाव लागेल कारण बहूसंख्य वाचक कदाचित पुस्तक उघडल्यावर त्यातील गणित आणि रेखा चित्र बघितल्यावर हे माझ्या आवक्या पलिकडचे आहे असे समजून ते खाली ठेवण्याची शक्यता आहे. पण ज्यांच भारतीय विज्ञानावर आणि खगोलशास्त्रावर प्रेम आहे त्यांचासाठी हे पुस्तक म्हणजे माजगावकर आणि आपटे यांची एक बहूमुल्य देणगी म्हणावी लागेल. कदाचित काही गणित अवघड वाटतील सुद्धा पण एकंदरीत ज्या कौशल्याने श्लोकांचे अर्थ दिले आहेत त्या मुळे ही गणिते आपल्याला कळायला सोपी झाली आहेत.

प्राध्यापक आपटे यांच्या लिखाणाचे आणि त्यातून हे आर्यभटीय चे शब्दार्थ, श्लोकार्थ, स्पष्टीकरण अशा पुस्तकाचे परिक्षण करावे ही माझी खरतर पात्रता नाही. पण जेव्हा पुस्तक माझ्या हातात पडले तेव्हा हे बाजारत येऊन अवघे दोन दिवस सुद्धा झाले नव्हते. ठाण्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी आपटे यांनी हे पुस्तक आयुकाचे संचालक प्रा. अजीत केंभावी यांना दिले होते आणि ठाणे ते पुणे या प्रवासात मला हे पुस्तक बघायला वेळ मिळाले होते. आणि जेव्हा या पुस्तकाचे परिक्षण करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मला कळलेला, मला आकलन झालेला भाग समोर ठेवत आहे. यातील जो भाग मला चुकीचा वाटला तो मलाच कळला नसावा ही माझी प्रामाणिक समजूत आहे.

खगोलशास्त्रावर प्रेम करणारा आणि त्यातून तो भारतीय असेल तर त्याला आर्यभाटाबद्दल माहीत नसेल अशी शक्यता कमीच पण खोलात जाऊन आर्यभाटाचे नेमक योगदान काय याची मात्र फार कल्पना नसते आणि माझ पण नेमक तेच झाल होत. पण या पुस्तकाच्या माध्यमातून मला आर्यभटाच्या कार्याला समजवून घेण्याची संधी मिळाली आहे.

या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे या पुस्तकाचा, आर्यभटाचा आणि आर्यभटाच्या कार्याचा परिचय जो १३ व्या पानावर संपतो. पुढे २४५ पानांपर्यंत लेखाने आर्यभटीयायील ५० श्लोकांचा शब्दार्थ, श्लोकार्थ आणि स्पष्टीकरण आपल्या समोर ठेवले आहे. आणि शेवटच्या ६ पानात ५ परिशिष्टांच्या माध्यमातून त्यानी आर्यभाटीयातील गणितची पाश्चात्य आणि आधुनिक गणिताशी तुलना दिली आहे.

ज्याना आपल्या (भारतीय) संस्कृतीचा, आपल्या कडे झालेल्या शोधका-याचा अभिमान आहे त्यानी विशेषतः अशा लोकांनी ज्याना वाटतं की विश्वातील सर्व ज्ञान आपल्याच कडे होतं त्यानी तर हे पुस्तकातील पहिला भाग आवष्य वाचावा. या पहिल्या भागात लेखाने अवघ्या १३ पानात भारतीय विज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास दिला आहे. या संदर्भात लेखकाच्या भाषेतच सांगायचे झाले तर " प्राचीन काळी आपल्याकडे यंव ज्ञान होते, त्यंव तंत्रज्ञान उपलब्ध होते अशा गप्पा मारण्यात आपण प्रवीण आहोत. ब-याच वेळा मूळ ग्रंथाचे परिशीलन न करतातच आपण बाता माहीत असतो" . तर ज्याचा कल आपल्याकडे असलेलं सर्व ज्ञान पश्चिमेतून आल आहे त्यांचे डोळे या पुस्तकाचा दुसरा भाग वाचून पूर्ण उघडलीत. या भागात त्यानी आर्यभटीयातील दशगीतिका तील १३, गणितपाद मधील ३३, कालक्रियापाद मधील २५, गोलपाद ५० अशा १२१ मूळ श्लोकांचा शब्दार्थ, श्लोकार्थ आणि स्पष्टीकरण दिले आहेत.

पुस्तकाची सुरवातीलाच आर्यभट्ट का आर्यभट या वादाच्या संदर्भात लेखक स्पष्टपणे सांगतो की आर्यभटीय या ग्रंथाचा कर्ता आर्यभट आहे. आणि मग त्यानी आर्यभटाचा काळ, निवासस्थान, त्याच शिक्षण, त्याच्या ग्रंथाबद्दल कोणी (भारतीय आणि पाश्चात्य) काय भाष्य केलं आहे हे थोडक्यात पण स्पष्ट सांगीतलं आहे. तसेच इ.स. ४९९ साली लिहीलेला आर्यभटाने अवघ्या २३व्या वर्षी लिहीलेल्या आर्यभटीय या ग्रंथा पूर्वी कुठला ही ग्रंथ उपलब्ध नाही आणि म्हणून आर्यभटीय हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. तसेच या ग्रंथा मध्ये श्लोकांच्या माध्यमातून त्याने जी सूत्रे मांडली किंवा नियम सांगीतले ते कसे आले किंवा त्यानी ही गणिते कशी सोडवली याची आपल्याला काहीच माहिती नाही. त्या बद्दलच लिखाण उपलब्ध नाही.

प्रा. आपटे यांच्या लिखाणाच एक पैलु म्हणजे आर्यभटीय मधील जी बाब अचुक आहे ती तर त्यानी सांगीतलीच आहे पण काही ठिकाणी आर्यभट चुकला ही आहे. त्याच स्पष्टीकरण पण आपटे यानी दिले आहे. आणि जेव्हा त्याना अढळून आले की या श्लोकात संपूर्ण स्पष्टता नाही तर ते ही त्यानी नमूद केलेले आहे. जिथे त्याना शंका वाटली ती त्यानी स्पष्ट सांगीतली आहे. या श्लोकांबद्दल लिहीण्याचा मोह आवरता घेत फक्त दोन श्लोकांबद्दल सांगावेसे वाटते.

गोलपाद मधील ४७ वा श्लोकाच स्पष्टीकरण आपटेयानी दिल आहे की खग्रास सूर्यग्रहण काळात चंद्रबिंब सूर्याला झाकते परंतू सूर्यबिंबाचा सात अष्टमांश भाग झाकला गेला तरी सूर्यग्रहण लागल्याची जाणीव होत नाही. हे सत्य मी स्वतः ४ वेळा अनुभवल आहे.

आर्यभाटाच्या काळात ग्रहांच्या दीर्धवर्तुळाकृती भ्रमणाची कल्पना नव्हती. पृथ्वी हेच भगोलाचे केंद्र मानण्यात ये होते. पण ज्या मार्गाने ग्रह पृथ्वी भोवती भ्रमण करताना भासतात त्यांची केंद्र पृथ्वीकेंद्राशी जुळत नाहीत हे सत्य कालक्रियापाद मधील २१ श्लोकात आर्यभटाने नमुद केलं आहे.

प्रा. मोहन आपटे प्रांजळ पणे कबूल करतात की त्यांच संस्कृत भाषेच ज्ञान जुजबी आहे आणि त्यानी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. उमा वैद्य याची मदत घेतली. आपले कर्तव्य म्हणून त्यानी इशारा दिला आहे की वाचकांना आपल्या मेंदूला ब-यापैकी ताण द्यावा लागेल. पण तो ताण छान व्यायाम करून दमल्यावर जी आनंद देणारी अनुभुती होते तसा आहे.